जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा आणि मनासारखे शब्दही यायचे ||१||
नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघुनी कधी शेवटी जात असता वळूनी कितीदातरी पाहायचे असते ||२||
उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे ||३||
असे हि दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ॠतुंना ॠतुंनी जरा भागले कि नव्याने जुने झाड उगवायचे ||४||
मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे ||५||
आता सांज वेळी निघुनी घरातुनी दिशाहीन होवून चालायचे
आता पावूलेही दुखू लागली कि मीच त्यांना उरी घ्यायचे ||६||
|| जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरार्थासही अर्थ भेटायचे ||
– सौमित्र